Saturday, August 15, 2009

याच देशाला भारत म्हणतात...आमची माणसे अशीच जगतात...

'जन गण मन' चे शब्द कानावर पडले आणि मी सगळी कामं टाकुन सावधान उभा राहिलो. पण मनात नाना विचार येत होते. अनेक लोक हुतात्मा झाले भारत देशाला स्वतंत्र करण्यासाठी, पण आजची भारताची अवस्था एवढी ही काही चांगली नाही. भारत खुप प्रगती करत आहे पण काही गोष्टी भारताच्या प्रगतीसाठी खुप घातक आहेत. असंच मागे एकदा एक कविता केली होती. आज १५ ऑगस्ट च्या निमीत्ताने ती लिहावीशी वाटली इथे.


याच देशाला भारत म्हणतात...आमची माणसे अशीच जगतात...

रस्त्यावर खून पडतात...दिवसा रक्ताची होळी खेळतात
बरेचशे लोक उभे असतात...मारणारयांचे फोटो काढतात
मेलेल्यांचे पुतळे बनतात...मारणारे त्याना हार घालतात
बाकीचे सारे गिधाडे बनून...राहिलेल्याच्यी लक्तरे तोडतात

याच देशाला भारत म्हणतात...आमची माणसे अशीच जगतात...


जिवंत जळणारयाला जळू देतात...सारे शांतपणे उभे असतात
रस्त्यावर तमाशा पाहणारे...सारे आपल्यासारखेच असतात
काळवंडलेल्या माणुसकीबरोबर ... काळवंडलेले चेहरेही असतात
डोळ्यात अश्रू आणून काहीजण...औपचारिकताही पूर्ण करतात

याच देशाला भारत म्हणतात...आमची माणसे अशीच जगतात...


सारे रस्ते बंद पडतात...महात्म्यांना उपाशी ठेवतात
नावात काय असतं म्हणून...सारे त्याला 'उपोषण' म्हणतात
नंतर काही पुढारी येतात...हार तुर्‍यांनी सन्मान करतात
शब्दांची मग फेरफार करून...मोसंबीचा रस पाजतात

याच देशाला भारत म्हणतात...आमची माणसे अशीच जगतात...


या देशात फक्त...गुंडच राज्य करतात
हळुच बोला नाहीतर...संन्याशाला फाशी देतात
बोलुनचालुन गुंडच ते...नाही नाही ते धंदे करतात
कुठंच नाही डाळ शिजली ...तर राजकारणात प्रवेश करतात

याच देशाला भारत म्हणतात...आमची माणसे अशीच जगतात...


निवडणुका जवळ येतात...पुढारी मग अनवाणी चालतात
तू काय किंवा मी काय...सारेच त्यांच्या मागे असतात
घोषणा हवेत विरुन जातात...आश्वासनांचे फुगे फुटतात
एकदा मंत्री बनल्यावर...मुग गिळुन गप्प बसतात

याच देशाला भारत म्हणतात...आमची माणसे अशीच जगतात...


निवडणुका संपतात...शेंबडी लोकं मंत्री बनतात
जिंकणार्याला 'सत्ताधारी'...हारणार्याला 'विपक्ष' म्हणतात
सत्ताधारी' किंवा 'विपक्ष' ... एकाच माळेचे मणी असतात
लोकशाहीसारख्या खेळणाल्या...स्वतःच्या तालावर नाचवत राहतात

याच देशाला भारत म्हणतात...आमची माणसे अशीच जगतात...


विरपप्पन किंवा गवळी...सारे सरेआम फिरत असतात
पोलिस त्यांना संरक्षण देउन...आपली कर्तव्य चोख बजावतात
त्यांच तरी काय चुकलं...ते तर भाउबंदकीचा धर्म निभावतात
'सारे भारतीय बांधव आहेत'...अशी प्रतीज्ञा सारे घेतात

याच देशाला भारत म्हणतात...आमची माणसे अशीच जगतात...


स्वातंत्र्याची ज्योत खरं तर...सारेच पेटवत ठेवतात
दंगलीत आणि जाळपोळीत...तिच हाती घेतात
गर्जना जरी वेगळ्या तरी...उद्देश मात्र एकच असतात
मंदिर किंवा मस्जिद...रक्ताने बरबटलेले जातात

याच देशाला भारत म्हणतात...आमची माणसे अशीच जगतात...


बाहेरचे असे इंग्रज ...इथे येउन राज्य करतात
फक्त दीडशे वर्ष म्हणुन...लोक मनाचं समाधान करतात
'झंडा उंचे रहे हमारा'...कसं का होइना सारे म्हणतात
कारण वर्षातुन असे प्रसंग..फक्त दोनचवेळा येतात

याच देशाला भारत म्हणतात...आमची माणसे अशीच जगतात...


देवापुढे पैसे टाकतात..हवं नको ते सारं मागतात
एकच देश असा जिथे ...देवालाही लाच देतात
देवालाही लाजवतात..अशी सारी कूत्य इथे घडतात
म्हणुनच देवाला इथं...'दगड' बनवुन गप्प बसवतात

याच देशाला भारत म्हणतात...आमची माणसे अशीच जगतात...


सर्व भारतीय लोकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, जय हिद !

-अजय

5 comments:

Mahendra Kulkarni said...

अजय
खुपच सुंदर कविता झाली आहे..

Deepak said...

अजय,
वा!... काय मस्त लिहिलयस.. रोमांचक - स्फुर्तिदायक .... आणि जळजळीतही!


स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Abhijit Athavale said...

Really well written and expressive. I agree with the sentiment

Amey said...

Hmmm... Kavitechi tag line awadli nahi.. Nirashawadi kinva negative kavita vatli.. lihaychi shaili awadli.. ani ekach kavitet sagali wait baju ekdam dakhavlis...
Next kavita ashich changli kar..pan full2 positive ani nanyachi dusari baju mand... Ti kavita english madhe kar.. :)
Mala mahit navta pan tu yevdya changlya kavita kar shaktos te!!

Amey said...

Ani positive kavita english madhe lihilis tar tujhe vichar jagaparyanta pochatil asa mala mhanycha hota..