प्रसंग अगदी साधा, स्थळः पुणे सेंन्ट्रल, वेळ: शुक्रवार, संध्याकाळचे ४ वाजले असतील, मी जिन्स ट्रायल साठी ट्रायल रुमच्या बाहेर उभा. आत कुणीतरी होतं त्यामुळे तो बाहेर येण्याची वाट पहात मी उभा होतो. एक मुलगा हातात जीन्स आणि टी-शर्ट घेउन माझ्या समोर माझ्या पुढे येउन थांबला.
"दोस्त, प्लीज फॉलो द क्यू", मी त्याला अगदीत शिस्तीत म्हणालो."
"अरे यार एक ही जीन्स और एक शर्ट ट्राय करना हे, दो मिनीट लगेंगे सिर्फ", अगदी बेफिकीरपणे. कदाचीत कॉलेजकुमार असावा.
"मुझे भी दो ही मिनीट लगनेवाले है, और मै तेरे पहले से यहा खडा हूं.",माझा आवाज थोडा करडा झाला होता. तसा मी भांडणाच्या प्रवूत्तीचा नाही.माझ्या आजुबाजुच्या कुणालाही विचारा.
"खालीपिली तकतक क्यु कर रहा है".
"तकतक तु कर रहा है या मै"..मी एव्हाना पुरता गरम झालो होतो. कारण नसताना पुढचा मला डिवचत होता.
"जा नही हटुंगा इधरसे ,जो करना है वो कर"
आतापर्यंत बोलाचालीवर असलेली भांडण आता मारामारीवर येणार हे मी समजुन चूकलो होतो. समोरुन आव्हान मिळालं होतं. मी जर आता मागे हटलो तर मी पळपुटा ठरणार होतो.
"देख मै तुझे प्यार से बोल रहा हूं, लाइन मे मै तेरे से पहले आया हू", मी
"जा..नही पिछे हटता, जो करना है वो कर, तेरे बाप का मॉल है क्या"
त्याने माझा बाप काढला आणि क्षणार्धात माझा हाताची एक सणसणीत त्याच्या कानाखाली पडली. कानाखाली एवढ्या जोरात होती की तो दरवाजावर जाऊन आदळला आणि माझ्या हातालासुद्धा मुंग्या आल्या. त्याच्या डोक्याला दरवाजा लागला असावा. माझा हात लगेच बेल्टकडे गेला. बेल्ट काढणार तेवढ्यात आवाज ए॑कुन आजुबाजुचे चार लोक धावत आले. त्यात एक बाई सुद्धा होती. त्या मुलाला उठायचंसुद्धा समजत नव्हत. एकाने त्याला हात दिला. मला दोन लोकांनी धरलं.
तो मला वाटेल त्या शिव्या देत होता. मला ही जोर आला होता. मला धरलेल्या दोन लोकांना बाजुला सारुन मी त्याला लाथा मारायला सुरुवात केली. एखादी लाथ बसली असेन त्याला. त्याची ही एक लाथ मला बसली. आजुबाजुच्या लोकांमूळे
प्रकरण आवरलं गेलं. त्याने तुला दाखवतो अशी धमकी दिली. मी त्याला उभा कापेन असं प्रत्युत्तर दिलं. आजुबाजुचे लोक काय झालं म्हणुन विचारु लागले. एव्हाना मी थोडा शांत झालो होतो. सगळा रागरंग ओळखुन त्या मुलाने काढता पाय
घेतला. मी ही मग जास्त ताणुन न धरता माझ्या खाली पडलेल्या जीन्स उचलल्या. मुड पुरता खराब झाला होता. जीन्स ट्राय करुन मी ही तिथुन निघालो. आयुष्यात कदाचीत पहिल्यांदाच कुणावरतरी मी हात उचलला असेन.
लहानपणी एकदा माझ्या अंगावर एका पुढ्च्या वर्गातल्या मुलाने( सिनीअर ) शर्टवर शाई उडवली होती. त्याच्यावरुन माझी व त्याची भांडण झाली होती. त्यानंतर एवढ्या वर्षानंतर माझी कुणाशी मारामारी झाली असावी. मी जेव्हा होस्टेलला रहायला होतो तेव्हा माझा एक रुम पार्टनर मुस्लिम होता. एकदा आमची कशावरुन तरी भांडण झाली. त्याने माझं अवसान ओळखुन मला दम टाकला होता.
"साला मी मुसलमान आहे, हड्डी मांस खाउन बडा झालोय. कापाकापी मला नवीन नाही. बघायचय का तुला एकदा."
" तु मुसलमान असशील तर मी ९६ कुळी मराठा आहे. आणि मराठा एवढ्या दिवस काय करत होता हे तुला ही माहितेय. एकतर स्वत: तरी मरेन नाहीतर तुला तरी मारेन." हे उत्तर ए॑कुन नावाचा मुसलमान सुदधा नंतर माझ्याशी जपुनच
वागायला लागला होता.
मी आयुष्यात कधीही कुणाशी आपणहुन भांडण केलेली नाहीत, पण पुढुन जर आव्हान मिळालं तर मात्र माझं रक्त खवळल्याशिवाय रहात नाही हे ही तितकंच खरं.
--------------------------------------------------------------------------------
या ब्लॉग वरचे आवडीने वाचले गेलेले पोस्ट वाचा.
१. हा एक खरा घडलेला प्रसंग आहे
२. ब्राईड-हंट
३. यंदा कर्तव्य आहे ?
४. ए॑का आणि पोट धरुन हसा
--------------------------------------------------------------------------------
-अजय
सरळ रस्त्यापेक्षा वळणावळणाचे रस्ते मला आवडतात,त्यांना माहीत नसते रेघ.अशोक किंवा निलगिरी पेक्षा मला आवडतो तो वड, सगळीकडे उभा आडवा पसरलेला.एका रेषेतच जाणारया सुर्यकिरणांपेक्षा मला आवडतो तो वारा, मन वाटेल ति़कडे पळणारा. सरळ पडणारया पडणारया पावसाच्या थेंबापेक्षा जागा मिळेन तिथे वळणारी, डोंगरावरुन खळखळत वाहणारी नदीच मला जास्त वेड लावते. माझं आयुष्यही मला असंच जगायच. उधळलं तर उधळून द्यायचय, बेभान होऊन जसं ते नेईन तस मला त्याच्याबरोबर जायचंय, अगदी मोकाट, सुसाट, बेधुंद होऊन !
Tuesday, October 20, 2009
Friday, October 16, 2009
पुन्हा एकदा, ए॓का आणि पोट धरुन हसा
मागच्या वेळेस मी ए॓का आणि पोट धरुन हसा मध्ये बाबुराव च्या काही MP3 फाईल्स इथे अपलोड केल्या होत्या. त्या ए॑कल्या नसतील तर येथे टिचकी मारा. ९४.३ टोमॅटो एफम कोल्हापुर वरुन हा बाबुराव लोकांना फोन करुन त्यांची खेचत असतो. पुन्हा काही नवीन MP3 फाईल्स इथे अपलोड करत आहे. मीनल ने या फाईल्स दिल्याबददल तिचे आभार.
१. baburao employment
२. baburao konda
३. baburo zad
आपल्या प्रतिक्रियेचे स्वागत आहे.प्रतिक्रिया देतानातरी निदान कंजुषपणा करु नका!
-अजय
------------------------------------------------------------------------------------
१. ब्राईड-हंट
२. यंदा कर्तव्य आहे ?
३. हा एक खरा घडलेला प्रसंग आहे
------------------------------------------------------------------------------------
१. baburao employment
|
२. baburao konda
|
३. baburo zad
|
आपल्या प्रतिक्रियेचे स्वागत आहे.प्रतिक्रिया देतानातरी निदान कंजुषपणा करु नका!
-अजय
------------------------------------------------------------------------------------
१. ब्राईड-हंट
२. यंदा कर्तव्य आहे ?
३. हा एक खरा घडलेला प्रसंग आहे
------------------------------------------------------------------------------------
Saturday, October 10, 2009
'राज'कारण(२)
या ब्लॉग वरचे सर्वात जास्त वेळा पाहिले गेलेले पोस्ट वाचा.
१. ए॑का आणि पोट धरुन हसा
२. ब्राईड-हंट
3. हा एक खरा घडलेला प्रसंग आहे
मी माझ्या 'राज'कारण(१) या भागात सांगितले होतं की यावेळेस महाराष्टाच्या लोकांच्या मनात प्रचंड राग, असंतोष असुनही पुन्हा सोनियांबाईंचं आणि शरदबाबुंच्या काँग्रेसचं सरकार येईन. शिवसेना आणि भाजपा मध्ये त्यानंतर फूट पडेन. मनसे ला ६-७ जागा मिळतील. यापेक्षा जर त्यांना जास्त जागा मिळाल्या तर तो त्यांच्यासाठी बोनस ठरेन असा मा़झा अंदाज आहे. मला स्वतःला शिवसेना-भाजपाचा सरकार आलं तर खुप आनंद होईन आणि तेच आतातरी महाराष्ट्राच्या हिताचं असेन. राजची भुमिका मोठी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. कदाचीत काँग्रेस आघाडीला जर सरकार बनविण्यासाठी काही आमदारींची गरज असेन तर तो ती पुरी करु शकतो. युती आणि आघाडी दोघांकडे समसमान आमदार असतील तर मात्र राजची थोडी गोची होण्याची शक्यता आहे. कारण मराठीचा मुद्दा जर त्याला पुढे हाकायचा असेन आणि स्वत:च्या पक्ष जर सर्वदुर पोहोचावयाचा असेन तर कॉंगेसचे सरकार त्यासाठी पोषक ठरेन. युतीच सरकार मात्र त्याचे लाड खपवुन घेणार नाही याची त्याला पुरेपुर कल्पना असावी.
आज जरी काँग्रेस मनसे चा पाठींबा घेत नसेन तरी त्यांना उद्या त्यांच्याच पाया पडावं लागेन. राज ठाकरे अगदी पहिल्या दिवसांपासुन विधान करत आहेत की महाराष्ट्रात माझ्याशिवाय कुणाचीही सत्ता येणार नाही. हा राज यांचा ओव्हरकॉन्फीडन्स आहे असं काही़जण म्हणतील पण मला मात्र तसं बिलकुल वाटत नाही. कदाचीत राज ने ही गणित किंवा याचे ठोकताळे अगोदरच मांडलेले असावेत. यात विनाकरण तोटा हा शिवसेना आणि भाजपा चा होणार आहे. गेली १० वर्षे ते सत्तेपासुन दुर असुनही त्यांच्यात मोठी फूट पडलेली नाही. राज ठाकरे आणि नारायण राणे सोडुन कुणीही मोठा नेता शिवसेना सोडुन गेलेला नाही. राज ठाकरेंची शिवसेना सोडण्याची कारणे वेगळी होती. नारायण राण्यांनी शिवसेना सोडल्यामुळे शिवसेनेचे बरेच नुकसान झालेले आहे. शिवसेनेचे लोक हे जरी उघडपणे मान्य करत नसतील तरी ती वस्तुस्थिती आहे. मला उद्धव ठाकरे हे खरंच खुप कष्ठाळु नेते वाटतात आणि ते तसेच आहेत. पण त्यांच्या ज्या चुका झालेल्या आहेत त्या मात्र येत्या निवडणुकीत उट्टे काढल्याशिवाय राहणार नाही. मराठी आणि अमराठी यांच्यामध्ये सगळ्यात मोठी जर कुणाची अडचण झाली असेन तर ती उद्धवचीच. भाजपाचं मात्र ना नुकसान ना फायदा अशी स्थिती असेन. या ठिकाणी जर मी नितीन गडकरींचा उल्लेख केला नाही तर लेख अपुर्ण राहीन. नितीन गडकरींसारखा एक कष्टाळु आणि हुशार नेत्याचा फायदा महाराष्टाला करुन घेता आला नाही याची खंत आहे.
आज महाराष्ट्रात एक ना अनेक समस्या आहेत. सर्वात मोठा म्हणजे वीज. गेली १० वर्षे महाराष्ट्रात १ मेगावॅट सुद्धा वीज निर्माण झाली नाही ही वस्तुस्थिती आहे. आपल्या शेजारचा गुजरात हा त्याच १० वर्षात विजेबाबतीत जर स्वयंपुर्ण होत असेन तर महाराष्ट्रा का नाही? मी स्वत: माझ्या गावात १२-१४ तास लोडशेडींग अनुभवलेलं आहे. लाज वाटली पाहिजे या काँग्रेस आघाडीला. केंद आणि राज्य दोन्ही ठिकाणी यांच सरकार असुनही यांना काहीच करता आलं नाही. यांचा डोळा फक्त जमीनी, भुखंड हडप करणे आणि पैसे खाणे एवढाच आहे. स्वःताची तुंबडी भरण्याशिवाय यांनी काहीच केलेलं नाही. महागाई प्रचंड वाढलेली आहे. डाळी, साखर सर्व जीवनावश्यक वस्तुंचे भाव गगनाला भिडलेले आहेत. कमी दरात रेशन देण्याचं आश्वासन पाळलं गेलेलं नाही. रेशनींग ला मिळणारी डाळ ८ शिट्या केल्याशिवाय कुकर मध्ये शिजत नाही ही महिलांची तक्रार खरी आहे. गाई-म्हशी सुद्धा खाणार नाहीत असा गहु रेशनींगमध्ये दिला जातो. हे मी टाईमपास म्हणुन लिहीत नाही. कालच आयबीएन लोकमत मध्ये हे मी पाहिलंय. एकही पाण्याचा प्रकल्प पुर्ण झाला नाही आणि पवारांच्या हातात जोपर्यंत हे सारं आहे तोपर्यंत तो होणार नाही. शेतकरी दररोज आत्महत्या करतच आहेत. पॅकेज वाटली गेली पण ती किती गरजु लोकांना मिळाली हा खरंच चर्चेचा विषय आहे. शेतकर्यांना २४ तास विज, भरपुर पाणी आणि योग्य मोबदला हवा आहे, पॅकेज कसले वाटताय तुम्ही. आमचे मुख्यमंत्री मात्र हे सगळे प्रश्न सोडवायचे सोडुन झोपा काढतात, जुहु चौपाटी वर छट्पुजा साजरी करायला जातात, ज्या हॉटेल ताज मध्य अतिरेक्यांनी लोकांना अर्धनग्न करुन मारल त्याच ताज मध्ये हे रामगोपाल अणि स्वतःच्या मुलाला घेऊन साईट व्हिजीट करतात, जाहीरनामा मध्ये प्रिंटींग मिस्टेक झाली असेन म्हणुन खे खे हसतात, हाच विलास देशमुख स्वतःची खुर्ची वाचविण्यासाठी जेवढ्या वेळी दिल्ली ला गेला असेन तेवढ्या वेळेस त्याने विदर्भ-मराठवाड्यात आत्महत्या करणारया शेतकरयाना भेटी दिल्यात का हो ? अजुन असे कितीतरी प्रश्न आहेत. हे प्रश्न मी तुम्हाला विचारत नाहीये, हे प्रश्न तुम्ही स्वतःला एकदा विचारा आणि तुम्हीच ठरवा तुम्हाला काय करायच ते. "कानात सांगुन जर कुणी ए॓कत नसेन तर त्याच्या कानफटातच मारावी लागते..." हीच वेळ आहे सरकारच्या कानाखाली मारण्याची. अजुन काय सांगु , बाकी तुम्ही सुज्ञ आहातच !
-अजय
१. ए॑का आणि पोट धरुन हसा
२. ब्राईड-हंट
3. हा एक खरा घडलेला प्रसंग आहे
मी माझ्या 'राज'कारण(१) या भागात सांगितले होतं की यावेळेस महाराष्टाच्या लोकांच्या मनात प्रचंड राग, असंतोष असुनही पुन्हा सोनियांबाईंचं आणि शरदबाबुंच्या काँग्रेसचं सरकार येईन. शिवसेना आणि भाजपा मध्ये त्यानंतर फूट पडेन. मनसे ला ६-७ जागा मिळतील. यापेक्षा जर त्यांना जास्त जागा मिळाल्या तर तो त्यांच्यासाठी बोनस ठरेन असा मा़झा अंदाज आहे. मला स्वतःला शिवसेना-भाजपाचा सरकार आलं तर खुप आनंद होईन आणि तेच आतातरी महाराष्ट्राच्या हिताचं असेन. राजची भुमिका मोठी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. कदाचीत काँग्रेस आघाडीला जर सरकार बनविण्यासाठी काही आमदारींची गरज असेन तर तो ती पुरी करु शकतो. युती आणि आघाडी दोघांकडे समसमान आमदार असतील तर मात्र राजची थोडी गोची होण्याची शक्यता आहे. कारण मराठीचा मुद्दा जर त्याला पुढे हाकायचा असेन आणि स्वत:च्या पक्ष जर सर्वदुर पोहोचावयाचा असेन तर कॉंगेसचे सरकार त्यासाठी पोषक ठरेन. युतीच सरकार मात्र त्याचे लाड खपवुन घेणार नाही याची त्याला पुरेपुर कल्पना असावी.
आज जरी काँग्रेस मनसे चा पाठींबा घेत नसेन तरी त्यांना उद्या त्यांच्याच पाया पडावं लागेन. राज ठाकरे अगदी पहिल्या दिवसांपासुन विधान करत आहेत की महाराष्ट्रात माझ्याशिवाय कुणाचीही सत्ता येणार नाही. हा राज यांचा ओव्हरकॉन्फीडन्स आहे असं काही़जण म्हणतील पण मला मात्र तसं बिलकुल वाटत नाही. कदाचीत राज ने ही गणित किंवा याचे ठोकताळे अगोदरच मांडलेले असावेत. यात विनाकरण तोटा हा शिवसेना आणि भाजपा चा होणार आहे. गेली १० वर्षे ते सत्तेपासुन दुर असुनही त्यांच्यात मोठी फूट पडलेली नाही. राज ठाकरे आणि नारायण राणे सोडुन कुणीही मोठा नेता शिवसेना सोडुन गेलेला नाही. राज ठाकरेंची शिवसेना सोडण्याची कारणे वेगळी होती. नारायण राण्यांनी शिवसेना सोडल्यामुळे शिवसेनेचे बरेच नुकसान झालेले आहे. शिवसेनेचे लोक हे जरी उघडपणे मान्य करत नसतील तरी ती वस्तुस्थिती आहे. मला उद्धव ठाकरे हे खरंच खुप कष्ठाळु नेते वाटतात आणि ते तसेच आहेत. पण त्यांच्या ज्या चुका झालेल्या आहेत त्या मात्र येत्या निवडणुकीत उट्टे काढल्याशिवाय राहणार नाही. मराठी आणि अमराठी यांच्यामध्ये सगळ्यात मोठी जर कुणाची अडचण झाली असेन तर ती उद्धवचीच. भाजपाचं मात्र ना नुकसान ना फायदा अशी स्थिती असेन. या ठिकाणी जर मी नितीन गडकरींचा उल्लेख केला नाही तर लेख अपुर्ण राहीन. नितीन गडकरींसारखा एक कष्टाळु आणि हुशार नेत्याचा फायदा महाराष्टाला करुन घेता आला नाही याची खंत आहे.
आज महाराष्ट्रात एक ना अनेक समस्या आहेत. सर्वात मोठा म्हणजे वीज. गेली १० वर्षे महाराष्ट्रात १ मेगावॅट सुद्धा वीज निर्माण झाली नाही ही वस्तुस्थिती आहे. आपल्या शेजारचा गुजरात हा त्याच १० वर्षात विजेबाबतीत जर स्वयंपुर्ण होत असेन तर महाराष्ट्रा का नाही? मी स्वत: माझ्या गावात १२-१४ तास लोडशेडींग अनुभवलेलं आहे. लाज वाटली पाहिजे या काँग्रेस आघाडीला. केंद आणि राज्य दोन्ही ठिकाणी यांच सरकार असुनही यांना काहीच करता आलं नाही. यांचा डोळा फक्त जमीनी, भुखंड हडप करणे आणि पैसे खाणे एवढाच आहे. स्वःताची तुंबडी भरण्याशिवाय यांनी काहीच केलेलं नाही. महागाई प्रचंड वाढलेली आहे. डाळी, साखर सर्व जीवनावश्यक वस्तुंचे भाव गगनाला भिडलेले आहेत. कमी दरात रेशन देण्याचं आश्वासन पाळलं गेलेलं नाही. रेशनींग ला मिळणारी डाळ ८ शिट्या केल्याशिवाय कुकर मध्ये शिजत नाही ही महिलांची तक्रार खरी आहे. गाई-म्हशी सुद्धा खाणार नाहीत असा गहु रेशनींगमध्ये दिला जातो. हे मी टाईमपास म्हणुन लिहीत नाही. कालच आयबीएन लोकमत मध्ये हे मी पाहिलंय. एकही पाण्याचा प्रकल्प पुर्ण झाला नाही आणि पवारांच्या हातात जोपर्यंत हे सारं आहे तोपर्यंत तो होणार नाही. शेतकरी दररोज आत्महत्या करतच आहेत. पॅकेज वाटली गेली पण ती किती गरजु लोकांना मिळाली हा खरंच चर्चेचा विषय आहे. शेतकर्यांना २४ तास विज, भरपुर पाणी आणि योग्य मोबदला हवा आहे, पॅकेज कसले वाटताय तुम्ही. आमचे मुख्यमंत्री मात्र हे सगळे प्रश्न सोडवायचे सोडुन झोपा काढतात, जुहु चौपाटी वर छट्पुजा साजरी करायला जातात, ज्या हॉटेल ताज मध्य अतिरेक्यांनी लोकांना अर्धनग्न करुन मारल त्याच ताज मध्ये हे रामगोपाल अणि स्वतःच्या मुलाला घेऊन साईट व्हिजीट करतात, जाहीरनामा मध्ये प्रिंटींग मिस्टेक झाली असेन म्हणुन खे खे हसतात, हाच विलास देशमुख स्वतःची खुर्ची वाचविण्यासाठी जेवढ्या वेळी दिल्ली ला गेला असेन तेवढ्या वेळेस त्याने विदर्भ-मराठवाड्यात आत्महत्या करणारया शेतकरयाना भेटी दिल्यात का हो ? अजुन असे कितीतरी प्रश्न आहेत. हे प्रश्न मी तुम्हाला विचारत नाहीये, हे प्रश्न तुम्ही स्वतःला एकदा विचारा आणि तुम्हीच ठरवा तुम्हाला काय करायच ते. "कानात सांगुन जर कुणी ए॓कत नसेन तर त्याच्या कानफटातच मारावी लागते..." हीच वेळ आहे सरकारच्या कानाखाली मारण्याची. अजुन काय सांगु , बाकी तुम्ही सुज्ञ आहातच !
-अजय
Thursday, October 8, 2009
स्वप्न..एका घराचं !
"नमस्कार, *** बिल्डर्स का ?" , मी उगाचच पुणेरी स्टाईल मध्ये, पुणेरी स्टाइल मध्ये लोक भले मग ते जांभुळवाडी चे असोत वा उल्हासनगर चे, आव मात्र आणतात सदाशिव पेठेतला आपला जन्म असल्यासारखे. म्हणजे सुरुवातीला खुप गोड बोलणार अगदी चितळेंच्या मिठाईसारखं, शिवी जरी दिली तरी पुढच्याला ती शिवी लागली नाही पाहिजे याची दक्षता फक्त टिपीकल पुणेरी लोकच घेऊ शकतात यावर मा़झा ठाम विश्वास. माझ्या ओळखीतला एका टिपीकल पुणेरी मित्राला बावळट आणि मुर्ख याशिवाय दुसरया शिव्या येत नव्हत्या आणि त्या सुद्धा देताना तो खुप लाजत असे. "आळणी मटन, ना चव ना चोथा !"
"हां जीं, मैं *** बोल रहा हूं , *** बिल्डर्स , *** प्रोजेक्ट, आंबेगाव , मैं यहा के सेल्स पर्सन हू !"...पुढुन बिहारी टोन मध्ये कुणीतरी, हा आणि जी वर दाब टाकत आणि फोन वर बोलताना सुद्धा पाठीत ४० अंशाचा कोन करुन उभा राहिल्यासारखा.
"माझं नाव अजय आहे, मला तुमच्या आंबेगाव मधल्या प्रोजेक्ट विषयी चौकशी करायची होती. थोडी माहिती द्याल का ? "
" सर, ये हमारा पुना में सबसे बडा प्रोजेक्ट हैं | ब्ला ब्ला ब्ला....." त्याने त्याची टेप चालु केली. मला कुणी भैया सापडला ना की विलक्षण आनंद होतो. आणि त्यात बिहारी म्हणजे मग तर काय, मी जाम खुष असतो. मागे एकदा मी जेव्हा ब्लॉग वर 'राज' ची स्तुती केली होती तेव्हा मला एका मुलीचं (अर्थातच बिहारी मुलीचं) ई-पत्र आलं होतं. त्यात तिने राज बद्दल बरंच काही लिहिलं होतं आणि मी त्याच्याबद्दल लिहिलं म्हणून माझा ही त्यात उद्धार केला होता. तिने बिहारी या शब्दाबद्दल आक्षेप घेतला होता. ज्यांना स्वत:ला बिहारी म्हणुन घ्यायला लाज वाटते त्यांनी स्वाभीमानाच्या गप्पा मारु नयेत, नाही का?
"मला लोकेशन सांगता का तुमचं, मी बाणेर वरुन येणार आहे", मी... जसं काही मी त्या गावचाच नाही.
"आप बाणेर से सीधा पुना-बँगलोर हाइवे से आइये. सिंहगड रोड के उपर का एक नया ओव्हरबिज जहा खत्म होता है उधर ही डाये मुडीयें, बस उधर ही हमारा प्रोजेक्ट है"...खे खे खे हसत, काही कारण आहे का हसण्याचं , पण उगाचच !
साला म्हणे पुना-बँगलोर हाइवे, पुणे असा सरळ म्हणायला काय भाडं पडतंय का, पटना लुधीयाना सारखा पुना,ठाना करुन ठेवलंय यांनी. तुमच्या 'पटना' ना 'पुतना' किंवा 'पूतणी' केलं तर आवडेल का रे तुम्हाला ? तुमची जीभ वळत नसेन तर वळवायला शिका नाहीतर आम्ही वळवु एक दिवस.
"डाये मतलब लेफ्ट का राईट ? " , माझं हिंदी तसं लहानपणापासुनच कच्च आहे. मला अजुनही कुणी ढाई असं म्हटलं तर मी त्याला विचारतो की ढाई म्हणजे १.५ की २.५. उगाचच आर.आर.पाटलांसारखं मी "बडे बडे देशोंमे ए॓सी छोटी छोटी" सारखी जड वाक्य हिंदीतुन म्हणायच्या फंदात पडत नाही. ज्यात मी स्वतःला comfortable समजतो त्यात बोलणं नेहमीच चांगलं.
"लेफ्ट लेफ्ट..." , हे म्हणताना त्याने डाव हात दोनदा हलवला असावा.
आतापर्यंतच्या संभाषणातुन मला हे समजलं होतं की ह्या माणसाला मराठी समजत असावं पण बोलता येत नसावं. तो मी हिंदीतुन बोलण्याची वाट पहात होता. पण मी त्याच्या २ पाऊला पुढचा.
"बरं बरं, मला २ बी.एच.के बद्दल थोडी माहिती देता का ?", मला या साईटची सर्व माहिती असुनही मी त्याला हे विचारत होतो कारण मला पहायच होतं की दिपावली निमीत्त यांचे काय दर आहेत. तसा या प्रोजे़क्ट ला मी एक-दीड वर्षांपुर्वी भेट देउन आलेलो आहे. पण यांचे चढे भाव ए॓कुन माझा पारा चढला होता त्यावेळेस. यांनीच नाही तर पुण्यातले सर्व प्रापर्टीचे भाव यांनी चढवलेले आहेत. याचा राग बरेच दिवसांपासुन माझ्या मनात आहे. हे असं का घडतंय याचा मी विचार करु लागलो.
सर्व भारतातले रियल इस्टेटचे दर कमी होउन सुद्धा पुण्यातले दर हे उलटे वाढतच आहेत. सर्वत्र मंदी चालु आहे किंवा थोडीफार कमी होत आहे. पण हे बिल्डर लोक खुप माजलेत आणि त्यांना माजवलयं या आपल्या पुढारयांनी. हेच पुढारी यांच्याकडुन निवडणुकीच्या वेळेस पैसा घेतात आणि मग हे बिल्डर लोक आपल्याला हवा तसा कायदा वाकवतात. अहो गेल्या ३ वर्षात चार पटीने पुण्यातले भाव वाढलेत. सामान्य माणुस पुण्यात राहु शकणार नाही याची पुरेपुर काळजी आपले नेते लोक घेत आहे. २ बी.एच.के प्लॅट पुण्यात कुठेही गेलात तरी ३०-३५ लाखाच्या खाली मिळत नाही. आयुष्यात फक्त घर घेणं हे एवढच काम नसत कॉमन मॅन चं, त्याची अनेक स्वप्नं असतात आणि ती स्वप्न ही खुप छोटी छोटी असतात. एक छोटंस घर घ्याव, दररोज लागणारया वस्तु विकत घ्याव्यात, आपल्या मुलांना चांगल्या शाळेत घालावं, त्यांच नीट शिक्षण करावं , जमलंच तर एखादी दु-चाकी घ्यावी, मुलगी असेन तर तिच्या लग्नासाठी एक एक पैसा जमवुन तिचं लग्न करावं आणि आयुष्याच्या शेवटी पेन्शन नाही मिळाली तर थोडाफार पैसा बँकेत जमा करावा. पण एवढं करण सुद्धा त्या कॉमन मॅन ला जमत नाही. घरासाठी मोठ्मोठे लोन काढा, भलेमोठे EMI भरा, महिन्याचा पगारातुन भला मोठा हिस्सा गेल्यावर राहिलेल्या पैशातुन २४ तास न मिळणारया विजेचे विजबिल, सोसायटी बिल, फोन बिल, रात्री-अपरात्री येणारया पाण्याची पाणीपट्टी, नगरपालिकेचा टॅक्स , मुलांची शिक्षणाची फी, त्यांचा महिन्याचा खर्च, महिन्याच रेशन, त्यात डाळ , साखरेचे भाव गगनाला भिडलेले, दररोज ऑफीस ला जाण्याचा खर्च, येणारे पै-पाहूणे, आजारपणं, जीवन विमाचे हफ्ते, टॅक्स वाचवण्यासाठी करावी लागणारी सोय आणि त्याचे हफ्ते ...अशा कित्येक गोष्टी या कॉमन मॅन ला त्या महीन्याच्या पगारातुन भागवाव्या लागतात. हे सगळं करता करता तो अगदी मेटाकुटीला येतो. त्याला जीव नकोसा होतो. त्याचा अख्ख आयुष्य हे हफ्ते भरण्यातच जातं. घर ही एकच गरज नसते त्याची,अजुनही कित्येक गरजा असतात त्याच्या. त्याला कोण समजावुन घेणार. कोण आणि कधी विचार करणार याचा.
(क्रमशः : हे संभाषण असंच चालु राहणार आहे )
"हां जीं, मैं *** बोल रहा हूं , *** बिल्डर्स , *** प्रोजेक्ट, आंबेगाव , मैं यहा के सेल्स पर्सन हू !"...पुढुन बिहारी टोन मध्ये कुणीतरी, हा आणि जी वर दाब टाकत आणि फोन वर बोलताना सुद्धा पाठीत ४० अंशाचा कोन करुन उभा राहिल्यासारखा.
"माझं नाव अजय आहे, मला तुमच्या आंबेगाव मधल्या प्रोजेक्ट विषयी चौकशी करायची होती. थोडी माहिती द्याल का ? "
" सर, ये हमारा पुना में सबसे बडा प्रोजेक्ट हैं | ब्ला ब्ला ब्ला....." त्याने त्याची टेप चालु केली. मला कुणी भैया सापडला ना की विलक्षण आनंद होतो. आणि त्यात बिहारी म्हणजे मग तर काय, मी जाम खुष असतो. मागे एकदा मी जेव्हा ब्लॉग वर 'राज' ची स्तुती केली होती तेव्हा मला एका मुलीचं (अर्थातच बिहारी मुलीचं) ई-पत्र आलं होतं. त्यात तिने राज बद्दल बरंच काही लिहिलं होतं आणि मी त्याच्याबद्दल लिहिलं म्हणून माझा ही त्यात उद्धार केला होता. तिने बिहारी या शब्दाबद्दल आक्षेप घेतला होता. ज्यांना स्वत:ला बिहारी म्हणुन घ्यायला लाज वाटते त्यांनी स्वाभीमानाच्या गप्पा मारु नयेत, नाही का?
"मला लोकेशन सांगता का तुमचं, मी बाणेर वरुन येणार आहे", मी... जसं काही मी त्या गावचाच नाही.
"आप बाणेर से सीधा पुना-बँगलोर हाइवे से आइये. सिंहगड रोड के उपर का एक नया ओव्हरबिज जहा खत्म होता है उधर ही डाये मुडीयें, बस उधर ही हमारा प्रोजेक्ट है"...खे खे खे हसत, काही कारण आहे का हसण्याचं , पण उगाचच !
साला म्हणे पुना-बँगलोर हाइवे, पुणे असा सरळ म्हणायला काय भाडं पडतंय का, पटना लुधीयाना सारखा पुना,ठाना करुन ठेवलंय यांनी. तुमच्या 'पटना' ना 'पुतना' किंवा 'पूतणी' केलं तर आवडेल का रे तुम्हाला ? तुमची जीभ वळत नसेन तर वळवायला शिका नाहीतर आम्ही वळवु एक दिवस.
"डाये मतलब लेफ्ट का राईट ? " , माझं हिंदी तसं लहानपणापासुनच कच्च आहे. मला अजुनही कुणी ढाई असं म्हटलं तर मी त्याला विचारतो की ढाई म्हणजे १.५ की २.५. उगाचच आर.आर.पाटलांसारखं मी "बडे बडे देशोंमे ए॓सी छोटी छोटी" सारखी जड वाक्य हिंदीतुन म्हणायच्या फंदात पडत नाही. ज्यात मी स्वतःला comfortable समजतो त्यात बोलणं नेहमीच चांगलं.
"लेफ्ट लेफ्ट..." , हे म्हणताना त्याने डाव हात दोनदा हलवला असावा.
आतापर्यंतच्या संभाषणातुन मला हे समजलं होतं की ह्या माणसाला मराठी समजत असावं पण बोलता येत नसावं. तो मी हिंदीतुन बोलण्याची वाट पहात होता. पण मी त्याच्या २ पाऊला पुढचा.
"बरं बरं, मला २ बी.एच.के बद्दल थोडी माहिती देता का ?", मला या साईटची सर्व माहिती असुनही मी त्याला हे विचारत होतो कारण मला पहायच होतं की दिपावली निमीत्त यांचे काय दर आहेत. तसा या प्रोजे़क्ट ला मी एक-दीड वर्षांपुर्वी भेट देउन आलेलो आहे. पण यांचे चढे भाव ए॓कुन माझा पारा चढला होता त्यावेळेस. यांनीच नाही तर पुण्यातले सर्व प्रापर्टीचे भाव यांनी चढवलेले आहेत. याचा राग बरेच दिवसांपासुन माझ्या मनात आहे. हे असं का घडतंय याचा मी विचार करु लागलो.
सर्व भारतातले रियल इस्टेटचे दर कमी होउन सुद्धा पुण्यातले दर हे उलटे वाढतच आहेत. सर्वत्र मंदी चालु आहे किंवा थोडीफार कमी होत आहे. पण हे बिल्डर लोक खुप माजलेत आणि त्यांना माजवलयं या आपल्या पुढारयांनी. हेच पुढारी यांच्याकडुन निवडणुकीच्या वेळेस पैसा घेतात आणि मग हे बिल्डर लोक आपल्याला हवा तसा कायदा वाकवतात. अहो गेल्या ३ वर्षात चार पटीने पुण्यातले भाव वाढलेत. सामान्य माणुस पुण्यात राहु शकणार नाही याची पुरेपुर काळजी आपले नेते लोक घेत आहे. २ बी.एच.के प्लॅट पुण्यात कुठेही गेलात तरी ३०-३५ लाखाच्या खाली मिळत नाही. आयुष्यात फक्त घर घेणं हे एवढच काम नसत कॉमन मॅन चं, त्याची अनेक स्वप्नं असतात आणि ती स्वप्न ही खुप छोटी छोटी असतात. एक छोटंस घर घ्याव, दररोज लागणारया वस्तु विकत घ्याव्यात, आपल्या मुलांना चांगल्या शाळेत घालावं, त्यांच नीट शिक्षण करावं , जमलंच तर एखादी दु-चाकी घ्यावी, मुलगी असेन तर तिच्या लग्नासाठी एक एक पैसा जमवुन तिचं लग्न करावं आणि आयुष्याच्या शेवटी पेन्शन नाही मिळाली तर थोडाफार पैसा बँकेत जमा करावा. पण एवढं करण सुद्धा त्या कॉमन मॅन ला जमत नाही. घरासाठी मोठ्मोठे लोन काढा, भलेमोठे EMI भरा, महिन्याचा पगारातुन भला मोठा हिस्सा गेल्यावर राहिलेल्या पैशातुन २४ तास न मिळणारया विजेचे विजबिल, सोसायटी बिल, फोन बिल, रात्री-अपरात्री येणारया पाण्याची पाणीपट्टी, नगरपालिकेचा टॅक्स , मुलांची शिक्षणाची फी, त्यांचा महिन्याचा खर्च, महिन्याच रेशन, त्यात डाळ , साखरेचे भाव गगनाला भिडलेले, दररोज ऑफीस ला जाण्याचा खर्च, येणारे पै-पाहूणे, आजारपणं, जीवन विमाचे हफ्ते, टॅक्स वाचवण्यासाठी करावी लागणारी सोय आणि त्याचे हफ्ते ...अशा कित्येक गोष्टी या कॉमन मॅन ला त्या महीन्याच्या पगारातुन भागवाव्या लागतात. हे सगळं करता करता तो अगदी मेटाकुटीला येतो. त्याला जीव नकोसा होतो. त्याचा अख्ख आयुष्य हे हफ्ते भरण्यातच जातं. घर ही एकच गरज नसते त्याची,अजुनही कित्येक गरजा असतात त्याच्या. त्याला कोण समजावुन घेणार. कोण आणि कधी विचार करणार याचा.
(क्रमशः : हे संभाषण असंच चालु राहणार आहे )
Wednesday, October 7, 2009
ए॓का आणि पोट धरुन हसा
या ब्लॉग वरचे सर्वात आवडीने वाचले गेलेले लेख वाचा.
१. ब्राईड-हंट
२. मी 'पुरुष' बोलतोय !
३. यंदा कर्तव्य आहे ?
४. हा एक खरा घडलेला प्रसंग आहे
ए॓का आणि पोट धरुन हसा ---
९४.३ टोमॅटो एफम कोल्हापुर वरुन हा बाबुराव लोकांना फोन करुन त्यांची खेचत असतो. काही MP3 फाईल्स इथे अपलोड करत आहे. कालच मला एका मित्राने ह्या ऑडीओ फाईल्स पाठवल्या. पोट धरुन हसाल ए॓कताना ! हा बाबुराव म्हणजे खरंच भारी माणुस असावा.
1. Mess
२. Not For sale
याचा दुसरा भाग ए॑कलात का ? नाही ना, मग पुन्हा एकदा, ए॓का आणि पोट धरुन हसा
आपल्या प्रतिक्रियेचे स्वागत आहे.
-अजय
१. ब्राईड-हंट
२. मी 'पुरुष' बोलतोय !
३. यंदा कर्तव्य आहे ?
४. हा एक खरा घडलेला प्रसंग आहे
ए॓का आणि पोट धरुन हसा ---
९४.३ टोमॅटो एफम कोल्हापुर वरुन हा बाबुराव लोकांना फोन करुन त्यांची खेचत असतो. काही MP3 फाईल्स इथे अपलोड करत आहे. कालच मला एका मित्राने ह्या ऑडीओ फाईल्स पाठवल्या. पोट धरुन हसाल ए॓कताना ! हा बाबुराव म्हणजे खरंच भारी माणुस असावा.
1. Mess
|
२. Not For sale
|
याचा दुसरा भाग ए॑कलात का ? नाही ना, मग पुन्हा एकदा, ए॓का आणि पोट धरुन हसा
आपल्या प्रतिक्रियेचे स्वागत आहे.
-अजय
Monday, October 5, 2009
'राज'कारण (१)
"तुम्ही जर लाठ्या-काठ्यांची भाषा केली तर हा राज ठाकरे संपुर्ण महाराष्ट्रभर तलवार वाटपाचा कार्यक्रम हातात घेईन. तीन-साडेतीन हजार मैलावरुन इथे येउन ही भाषा नाही करायची" असं अबु आझमीला त्याच्याच भाषेत सांगणारा ठणकावुन सांगणारा, "उत्तर प्रदेशात जो उत्तर प्रदेश दिन साजरा होत नाही तो महाराष्ट्रात साजरा होतो, महाराष्ट्रात इथुन पुढे फक्त महाराष्ट्रदिनच साजरा होईन, बाकीचे कुठलेही दिन साजरे करता येणार नाहीत." असं म्हणुन संपुर्ण देशातल्या, विशेषता भैया लोकांचा राग ओढवुन घेणारा, "शांत बसतो म्हणुन काय गांडोंची अवलाद समजु नये यांनी..." असं ठाकरी भाषेत प्रत्युतर देणारा, "माझा दुसरया कुठल्याही भाषेबदद्ल राग किंवा द्वेष नाही, फक्त मराठीबद्द्ल हट्ट आहे" असं म्हणुन लोकंच्या काळजाला हात घालणारा, मराठीत पाट्या लावा म्हणून आंदोलन करणारा, आपल्या प्रत्येक विधानावर ठाम असणारा, कधी मिश्कील तर कधी तेवढ्याच आक्रमकपणे आपला मुदुदा समोरच्याला पटवुन देणारा अशी ज्याची ओळख करुन देता येइन तो म्हणजे राज ठाकरे.
Love them or hate them, But you can not ignore them असं पुर्वी मार्क्सवादी पक्षाबाबतीत म्हटलं जायचं, आता हेच वाक्य राजच्या बाबतीत अगदी योग्य वाटतय. आज प्रत्येक वर्तमानपत्रात मनसे किंवा राज ठाकरे बद्द्ल रकाणे च्या रकाणे भरुन येत आहेत. प्रत्येक चॅनेल वरती दररोज त्यांची मुलाखत होत आहे. स्वतःच म्हणण राज आजकाल खुप ठामपणे मांडत आहे. मागच्या लोकसभेच्या वेळेस त्याच्या पक्षाने जी भरभरुन मतं मिळवली त्याचाच परिणाम म्हणुन की काय राज आजकाल खुप कॉन्फीडन्ट दिसत आहे. राज मध्ये एक करीश्मा आहे, तो म्हणजे त्याचं बोलणं, समोरच्यावर छाप पाडणे आणि तरूण-महीला वर्गाला मोहीत करणे. याच्याच बरोबर तो जे मुद्दे मांडत आहे ते लोकांच्या अगदी जिव्हाळ्याचे आहेत. मराठीच्या गळचेपीचा मुददा, महाराष्ट्राची अस्मितेचा मुद्दा, नोकरयांचा मुद्दा म्हणा किंवा अजुन कुठलाही मुद्दा असो...राज तो मुद्दा प्रभावीपणे मांडतो.
राजचा पक्ष यावेळेस किती जागा मिळवेन याच्यापेक्षा तो शिवसेनेचं किती नुकसान करेन यातच लोकांना जास्त रस आहे असं दिसुन येतंय. राज मतं खातोय हे वरकरणी जरी खरं असलं तरी जर नीट विचार केला तर हे जाणवतय की ही वेळ एका transition ची आहे. लोकांना एक नवीन पर्याय मिळु पाह्तोय. लोक राजच्या personality किंवा राजच्या बोलण्यावर भाळुन मतं देतात असं जर कुणी म्हणत असेन तर त्याला मी नक्कीच विरोध करेन. लो़क कदाचीत अशाच एका तरूण तडफदार नेत्यासाठी डोळे लावुन बसले होते. तुम्ही नायक हा सिनेमा पाहिला असेन, त्यात अनिल कपुर एका दिवसात मुख्यमंत्री बनुन जे काही सिस्टीम बदलुन टाकतो ते बघताना आपण टाळ्या वाजवतो. राज बहुतेक त्याच नायकाच्या पावलावर पाउल टाकुन चाललाय असं कुठंतरी नक्की वाटुन जातं.
मला स्वत:ला असं वाटतं की राजला यावेळेस जास्त जागा मिळणार नाहीत, त्यालाही त्याचा अंदाज आहे. पण त्याचीही ही निवडणुक म्हणजे ट्रायल आहे. २०१४ आणि २०१९ हेच त्याचं लक्ष असेन. माझा अंदाज असं सांगतो की राजच्या जास्तीत जास्त ६-७ जागा निवडुन येतील. आघाडी सरकार विरुद्ध लोकांमध्ये खुप राग असुनही सरकार पुन्हा आघाडीचंच येईन. शिवसेना आणि भाजपा मध्ये निवडणुकीनंतर फाटाफूट चालु होईन. याच्यापेक्षा जर जास्त जागा मनसे ला मिळाल्या तर असं समजायला हरकत नाही की अजुन ही महाराष्ट्रातील लोक मुद्यावर मते देतात आणि कदाचीत अशीच मते महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन अध्याय सुरु करतील.
(क्रमशः)
-अजय
Love them or hate them, But you can not ignore them असं पुर्वी मार्क्सवादी पक्षाबाबतीत म्हटलं जायचं, आता हेच वाक्य राजच्या बाबतीत अगदी योग्य वाटतय. आज प्रत्येक वर्तमानपत्रात मनसे किंवा राज ठाकरे बद्द्ल रकाणे च्या रकाणे भरुन येत आहेत. प्रत्येक चॅनेल वरती दररोज त्यांची मुलाखत होत आहे. स्वतःच म्हणण राज आजकाल खुप ठामपणे मांडत आहे. मागच्या लोकसभेच्या वेळेस त्याच्या पक्षाने जी भरभरुन मतं मिळवली त्याचाच परिणाम म्हणुन की काय राज आजकाल खुप कॉन्फीडन्ट दिसत आहे. राज मध्ये एक करीश्मा आहे, तो म्हणजे त्याचं बोलणं, समोरच्यावर छाप पाडणे आणि तरूण-महीला वर्गाला मोहीत करणे. याच्याच बरोबर तो जे मुद्दे मांडत आहे ते लोकांच्या अगदी जिव्हाळ्याचे आहेत. मराठीच्या गळचेपीचा मुददा, महाराष्ट्राची अस्मितेचा मुद्दा, नोकरयांचा मुद्दा म्हणा किंवा अजुन कुठलाही मुद्दा असो...राज तो मुद्दा प्रभावीपणे मांडतो.
राजचा पक्ष यावेळेस किती जागा मिळवेन याच्यापेक्षा तो शिवसेनेचं किती नुकसान करेन यातच लोकांना जास्त रस आहे असं दिसुन येतंय. राज मतं खातोय हे वरकरणी जरी खरं असलं तरी जर नीट विचार केला तर हे जाणवतय की ही वेळ एका transition ची आहे. लोकांना एक नवीन पर्याय मिळु पाह्तोय. लोक राजच्या personality किंवा राजच्या बोलण्यावर भाळुन मतं देतात असं जर कुणी म्हणत असेन तर त्याला मी नक्कीच विरोध करेन. लो़क कदाचीत अशाच एका तरूण तडफदार नेत्यासाठी डोळे लावुन बसले होते. तुम्ही नायक हा सिनेमा पाहिला असेन, त्यात अनिल कपुर एका दिवसात मुख्यमंत्री बनुन जे काही सिस्टीम बदलुन टाकतो ते बघताना आपण टाळ्या वाजवतो. राज बहुतेक त्याच नायकाच्या पावलावर पाउल टाकुन चाललाय असं कुठंतरी नक्की वाटुन जातं.
मला स्वत:ला असं वाटतं की राजला यावेळेस जास्त जागा मिळणार नाहीत, त्यालाही त्याचा अंदाज आहे. पण त्याचीही ही निवडणुक म्हणजे ट्रायल आहे. २०१४ आणि २०१९ हेच त्याचं लक्ष असेन. माझा अंदाज असं सांगतो की राजच्या जास्तीत जास्त ६-७ जागा निवडुन येतील. आघाडी सरकार विरुद्ध लोकांमध्ये खुप राग असुनही सरकार पुन्हा आघाडीचंच येईन. शिवसेना आणि भाजपा मध्ये निवडणुकीनंतर फाटाफूट चालु होईन. याच्यापेक्षा जर जास्त जागा मनसे ला मिळाल्या तर असं समजायला हरकत नाही की अजुन ही महाराष्ट्रातील लोक मुद्यावर मते देतात आणि कदाचीत अशीच मते महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन अध्याय सुरु करतील.
(क्रमशः)
-अजय
Subscribe to:
Posts (Atom)